
या सामन्याला प्रेक्षकांचा जबरदस्त पाठिंबा लाभला होता. सामन्याच्या सुरवातीपासूनच प्रेक्षकांनी "इंडिया इंडिया'च्या घोषणा देत भारताला जोरदार पाठिंबा दिला होता. संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या संदीप सिंगने पाच गोल करत भारताला जवळपास एकहातीच लंडनवारीचे तिकीट मिळवून दिले. पेनल्टी कॉर्नरवर राखलेली हुकूमत आणि भक्कम बचावामुळे भारतीयांनी फ्रान्सला अजिबात संधीच दिली नाही. रविवारी भारताला सात पेनल्टी कॉर्नर मिळाले. यातील सहा सत्कारणी लावले. यातही, एकट्या संदीप सिंगनेच पाच गोल केले. वीरेंद्र लाक्राने 17व्या मिनिटास गोल करत भारताचे खाते उघडले. सिमॉन मार्टिनने 23व्या मिनिटास फ्रान्सचा एकमेव गोल केला.
No comments:
Post a Comment